Complete Monologue by Subhash Apte in Marathi:
१९४८ साली गांधींचा वध झाला तेंव्हा मी आठ वर्षांचा होतो. दुसऱ्या दिवशी मी सकाळी उठलो तर सगळे वरचे लोक ओरडत होते. पेपर मध्ये आले आहे महात्मा गांधींचा खून झाला आणि मारेकरी पळून गेले अशी बातमी पेपर मध्ये आली होती आणि त्यात एक उल्लेख होता की मारेकऱ्यामध्ये गोडसे व आपटे आहेत. मी काही पेपर वाचला नव्हता परंतु वरती पटेल म्हणून राहत होते त्यांचा मुलगा होता त्याचे नाव आठवत नाही मी बाहेर आल्यावर ते म्हणाले, “गांधीजींचा मारेकरी आला, गांधीजींचा मारेकरी आला”. मी म्हणालो, “काय केले रे मी बाबा तुझे?”. अरे तुम्हारे चाचाने मारा है उसको! गांधी को मारा! पण मला काहीच कळले नाही. मी परत घरात आलो आणि वडिलांना विचारलं हे कसे का मला चिडवताहेत? ते म्हणाले, तू बाहेर कोणाशीही काही बोलू नकोस. पण तो बाहेरून मोठ्याने बोलत होता, “वह मारनेवाला चालमे रहाताहै आपटे!” पण आम्ही कोणीच त्याला प्रतिसाद दिला नाही. दुर्लक्ष केलं. थोड्या वेळाने तो शांत झाला. त्याने बोलायचे बंद केले. नंतर माझ्या वडिलांनी पेपर वाचला आणि सांगितले, “गांधीजींचा खून झाला आहे. आपटे आणि गोडसे यांनी खून केला आहे. आपलं आडनाव साधर्म्य आहे त्यामुळे आपल्याला ते लोक म्हणत आहेत. तू कोणाकडे लक्ष देऊ नको”. असा सर्वाना सांगितलं. त्या दिवशी आम्ही कोणी शाळेत गेलो नाही. आम्ही आपला घरातच होतो.
(more…)











